वृत्तपत्र हा जणु एक आधारचं.

      गजबजलेलं शहर असो की  ग्रामीण भाग असो आजवर सगळीकडेच वृत्तपत्रे जाऊन पोहचली आहे. आपल्या जीवनात जसे टी. व्ही. , मोबाईल , संगणक ही प्रसारमाध्यमे जशी महत्वाची आहेत . तसेच वृत्तपत्र हे देखील एक प्रसारमाध्यमांचा अविभाज्य महत्वाचा भाग आहे. माहिती देणे , मार्गदशन करणे आणि मनोरंजन करणे अशी वृत्तपत्राची कार्य बनली गेली आहे. समाजाच्या जडणघडणीत वृत्तपत्रासारखं सुलभ आणि जनसामान्यांपर्यंत जाऊन पोहचणारं अन्य साधन नाही.
     वृत्तपत्राचं कार्य म्हणजे राजकीय घडामोडी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचणे. व जनतेला जागृत ठेवणं हे आहे. ही कार्ये खूपच व्यापक बनली गेली आहेत. राजकीय घडामोडींबरोबरच वैंज्ञानिक , वैचारिक , सामाजिक आणि संस्कृतीक परिवर्तनाला हातभार लावणं हेही एक वर्तमानपत्राचं महत्वाचं कार्य ठरलं. अर्थव्यवस्था , साहित्य , लोकशिक्षण , समाजसुधारणा , इतिहास , धर्माचं तत्वज्ञान अशा अनेक अंगांनी वर्तमानपत्रांचं कार्य विस्तारत गेलं आहे. काही अभ्यासु  व्यक्तींचे विविध लेखन वृत्तपत्रात सतत येत असते त्यामुळे सामान्य वाचकांना अनेक नवनवीन माहिती मिळू लागते. व सामान्य वाचक तो वृत्तपत्र अतिशय आवडीने वाचत बसतो.
      वृत्तपत्रांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती दिसतात. आजवर जगात काय घडते . मग ते राजकीय असो वा सामाजिक घडामोडी असू ह्यांचे जाहिरात वृत्तपत्रात छापील झालेले आपल्याला दिसते. वस्तूंच्या किमतीत चढउतार , नवे विचार , वैज्ञानिक घडामोडी , नाटक , सिनेमा , कला , क्रीडा , राशी भविष्य , दैनंदिन कार्यक्रम , जाहीर नोटीसा , नोकरीची जाहिरात , जागेसाठी(बिल्डींग्सची) जाहिरात, होम लोन जाहिरात , बॅंकेचे जाहिरात , दूरदर्शनवरील मालिकांचे जाहिरात , हिरो हेरोइनचे जीवनावरील जाहिरात , आकाशवाणीवरील दैनंदिन कार्यक्रम , रोजचं पंचांग , विविध ठिकाणी होणाऱ्या स्पर्धा तसेच विरंगुळया बरोबरच ज्ञानात भर घालणारी कोडी , संस्था आणि सेवाभावी कार्यकर्ते यांचा परिचय , सोन्याच्या ज्वेलर्सचे जाहिरात असे खूप काही आपल्याला वर्तमानपत्रातून वाचायला मिळत व आपल्या पर्यंत अधिक माहिती पोहचत असते. 
      वृत्तपत्रांबरोबर अनेक मासिकांचा उदय झाला . व या मासिकांचा प्रभाव देखील  प्रसारमाध्यमांमध्ये  येत आहे. आज अनेक वाचक वर्तमानपत्रातील बातम्यांवरून आपले मत बनवितात ही वस्तुस्थिती आहे. वृत्तपत्र हा सामाजिक जीवनाचा जनु आरसाच बनला आहे. व सामाजिक परिवर्तनांच ते एक प्रभावी साधन आहे . वृत्तपत्रांची जेवढी निकोष वाढ होईल तेवढी वृत्तपत्र समाजाला अधिक माहिती व मार्गदर्शन मिळेल असे माझे मत आहे . 
       आजच्या तारखेला इतर माध्यमांपेक्षा वृत्तपत्र हे प्रसारमांध्यम  अतिशय महत्वाचं माध्यम बनले आहे. मोबाईलद्वारे कितीही फेसबुक , व्हाटसप , ट्विटर व इतर बातम्यांचे एप यांच्या माध्यमांतून देश , परदेशातील माहिती आपल्या पर्यंत लगेचच पोहचते. परंतु मोबाईल मधले असे काही एप वयस्कर लोकांनां लगेचच हाताळता येत नाही म्हणून त्यांना त्यांचा विश्वास व आधार वृत्तपत्र वाटतो. ह्या माध्यमांचा शेवट कधी होणारचं नाही कारण हे माध्यम आपल्या सामाजिक जीवनाचा एक जणु भागच आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छता ही काळाची गरज

मोबाईल शाप की वरदान

संगणक : गरज की हव्यास ?